स्वतःचे घर जळत असताना एका कुटुंब प्रमुखाचे काम काय असते? त्याने घरी थांबून घरातील आग विझवायला हवी की पाहुण्यारावळ्यांच्या घरी फिरत बसून...
स्वतःचे घर जळत असताना एका कुटुंब प्रमुखाचे काम काय असते? त्याने घरी थांबून घरातील आग विझवायला हवी की पाहुण्यारावळ्यांच्या घरी फिरत बसून त्यांच्याकडून स्वतःचे सत्कार करून घ्यायला हवेत? अशाप्रकारे पाहुण्यांच्या घरी जाऊन स्वतःचे सत्कार करून घेणाऱ्या कुटुंब प्रमुखाला तुम्ही निश्चितच नालायक म्हणाल. कारण त्याला स्वतःच्या कुटुंबाची काळजी नाही. फक्त स्वतःचा उदो उदो करून घ्यायला आवडते.
भारतात मणिपूर जळत असताना भारताचा पंतप्रधान परदेशवाऱ्या करत आहे. परदेशात जाऊन इव्हेंट मॅनेजमेंट करून मोठे मोठे कार्यक्रम घेत आहे. त्या कार्यक्रमांमध्ये स्वतःचा उदो उदो करून घेत आहे. मीडियामधून स्वतःच्या कौतुकाचे कार्यक्रम करवून घेत आहे. अशा पंतप्रधानाला तुम्ही काय म्हणाल? मे महिन्यातच मणिपूरमध्ये महिलांना नग्न करून त्यांची धिंड काढली जाते. तिथली इंटरनेट सेवा बंद असल्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बातमी देशाच्या इतर भागात अजिबात पोहोचत नाही. प्रस्थापित मीडियामध्ये ही बातमी दाबली जाते. सरकारी यंत्रणेला हे सगळे माहीत असूनही देशाच्या दुसऱ्या भागात ही बातमी पोहोचू दिली जात नाही. आणि धिंड काढणाऱ्या लोकांवर कुठली कारवाई सुद्धा केली जात नाही. याला तुम्ही काय म्हणाल? आणि भारतीय जनता का शांत आहे? दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर मेणबत्त्या घेऊन मोर्चे काढणारे लोक आता सोयीस्करपणे शांत बसलेले आहेत. भारतात ही कसली उदासीनता आली आहे? धर्म आणि जातीच्या नशेत लोक तर्रर्र झाले आहेत का? भारताचे पुढे काय होणार आहे? भारत अराजाकाच्या दिशेने चालला आहे का? आपणाला काय वाटते जरूर कमेंटमध्ये सांगा.
COMMENTS